परभणी जिल्ह्यात निवडणुकीपुरतं गावांमध्ये येऊन नंतर गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींना स्वराज्य” धडा शिकवेल
संपादक अहमद अन्सारी. निवडणुकीपुरतं गावांमध्ये येऊन नंतर गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींना स्वराज्य धडा शिकवेल छत्रपती संभाजीराजे हे सध्या स्वराज्य विस्तारासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील गावोगावी स्वराज्याच्या शाखा उद्घाटनासाठी छत्रपती संभाजीराजे हे स्वतः गावागावांत जात आहेत. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत

आहेत.यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की,परभणी जिल्ह्याच्या गावागावात फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींनी नेहमी या गावांकडे दुर्लक्षच केले आहे. आजपर्यंत एकदाही डांबरी रस्ते न झालेली अशी अनेक गावे आहेत. केवळ निवडणुकीपुरतं या गावांमध्ये येऊन नंतर या गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींना स्वराज्य धडा शिकवेल,

अशी घोषणा संभाजीराजे यांनी केलीजनतेचे स्वराज्य वरील हे अफाट प्रेमच स्वराज्याची ताकद असून ही ताकद याच जनतेच्या विकासासाठी, उन्नतीसाठी एकवटली जाईल, असेही यावेळी संभाजीराजे म्हणाले.यावेळी पूर्णा तालुक्यातील 25 गावातील स्वराज्य संघटनेच्या शाखा उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वराज्य प्रवक्ते करण गायकर

धनंजय जाधव, माधव देवसरकर गंगाधर अण्णा काळकुटे आप्पासाहेब कुडेकर तसेच जिल्हा निमंत्रक नितीन देशमुख तालुका निमंत्रक साहेबराव कल्याणकर, माधव आवरगंड माऊली कदम ,मंगेश कदम ,शिवराज जोगदंड, गजानन जोगदंड, संजय पवार यासह सर्व स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्ते उपास्थित होते