मुक्ताईंची पालखी चे मत्स्योदरी देवी संस्थान परिसरात वास्तव्य केले.
मत्स्योदरी देवी संस्थान परिसरात वास्तव्य केले.
अंबड प्रतिनिधी :- सलग अकराव्या वर्षी मुक्ताईनगर येथील मुक्ताईंची पालखीचे अंबड शहरात आगमन झाले.मुक्ताईंची पालखीचे सुमारे सातशे भाविकांनी मत्स्योदरी देवी संस्थान परिसरात वास्तव्य केले संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार चंद्रकांत शेळके व त्यांच्या पत्नी अर्चना शेळके यांच्या हस्ते मुक्ताईंच्या पादुकांना अभिषेक घालण्यात आला.
मुक्ताई पालखीचे प्रमुख हरणे गुरुजी अंबड शहरातील स्वयंसेवक यांनी नाश्ता व चहापाणी ची व्यवस्था केली.यावेळी संस्थांचे व्यवस्थापक कैलास शिंदे व कर्मचाऱ्यांनी पुरेपूर व्यवस्था केली व त्यानंतर सकाळी सात वाजेच्या सुमारास पालखीची रवानगी झाली.